काव्यसंग्रह मनस्वी

 निवारा

तिथलं घड्याळ चालतं,

तिथे सूर्यही उगवतो

पण तिथल्या काळाला

वेळेचं भान नाही……


दिवस येतोसंपून जातो,

महिने आणि ऋतू ही बदलतात,

तरिही तिथलीपिकली पानं

असहाय्यपणे जीवनावर लोंबकळतात.


निवाराआधारसांजअशा 

सुखद नावांचे वृध्दाश्रम दिसतात.

सुखासुखी कुणी आलेला नसतो,

ते माणसांचे कोंडवाडेच असतात.


तिथले डोळे रडत असतात,

कधी कुणाची तक्रार घेऊन.

गुपचुप काही अश्रू झरतात,

चुका स्वत:च्या उशिरा कळून.


मृत्यू तिथूनरिकाम्या वेळात,

फेरफटकामारून जातो.

आधीच मेलेल्या अेका जिवाला,

सोबत थोडी करून देतो.


ती जागारिकामी होताच,

नव्यांची पुन्हा झुंबड होते.

राजा-राणीच्यासंसारातील

अेक अडचण दूर होते.


चारुलता काळे.

——————————————


(☝️माझ्या ‘मनस्वी’ ह्या काव्य संग्रहाताला अेक कवितासाधारण पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेली,  आता भारतात वृध्दाश्रमांकडे पहाण्याचा दृष्टिकोण, मानसीकता बदलली आहेबदलते आहे पण तरिही या कवितेतील वेदना तशीच आहे.)

टिप्पण्या

Shalmali म्हणाले…
Oh my God Aai. I loved your article. Keep adding your excellent poems and article.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

प्रवास वर्णनः ग्रीस 2

लेखः ओशो भाग ३