पोस्ट्स

पार्किन्सन-अल्झायमर

 पार्किन्सन-अल्झायमर  वक्ता- डॉ. शिरीष बर्वे शनिवार दिनांक २५/७/२०२६ या दिवशी एका  मायक्रोसॉफ्ट टीम मीटच्या (मोबाइल मिटिंग) माध्यमातून डॉ. शिरीष बर्वे या शास्त्रज्ञाचे प्रेझेंटेशन पहाता आलं. अमेरिकेच्या  विविध भागातून तसेच भारतातून काही लोक या ऑनलाइन मीट मधे सहभागी झाले होते.  डॉ. शिरीष बर्वे हे केन्टकी, अमेरिका येथील University of Louisville मधील एक प्रसिद्ध प्राध्यापक आणि Norton Healthcare मधील मुख्य संशोधन वैज्ञानिक (Chief Research Scientist) आहेत. ते गट-ब्रेन कनेक्शन (gut-brain axis) आणि मायक्रोबायोम संशोधनातील आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. नॉरटन न्यूरोसाइंस इन्स्टिट्यूट मधे  ते मुख्य संशोधन वैज्ञानिक, ह्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. पार्किन्सन, अल्झायमर आणि मज्जासंस्थेचे आजार हे डॉ शिरीष बर्वे यांचं संशोधन क्षेत्र आहे.  पार्किन्सन आणि अल्झायमर या दोन आजारां विषयीची साधारण माहिती अशीः    पार्किन्सन रोग हा मेंदूचा एक गंभीर विकार आहे, ज्यामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण रहात नाही.  हात-पाय थरथरणे, स्नायू कडक होणे, हालचाली मंदावणे आणि...

विजया मेहता

विजया मेहता   “विजया मेहता यांचे ३० जून २०२६ रोजी निधन झाले.” ही बातमी ऐकली, वाचली आणि पाहिली सुध्दा. मधे काही दिवस गेले, का कशी माहित नाही, आज पुन्हा विजया बाईंची आठवण आली. “आपणही काही लिहावं का त्यांच्या बद्दल!” मनात आलं आणि लिहीत गेले. हा लेख लिहितांना निधन झालंय पण ज्या व्यक्ती अजरामर कतृत्व गाजवून गेल्या किंवा ज्या मनाच्या जवळ आहेत त्यांच्या नावाच्या आधी मला ‘स्वर्गीय’ हा शब्द लिहावा असं वाटलं नाही म्हणून मी तसं    लिहिलं नाही.  “अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका तसेच जाणकार अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचं ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र ज्यातून उलगडत गेलेली रंगभूमीची गोष्ट/ माहिती, रसिक वाचकांना माहीत आहे. बाईं बद्दल इतकं लिहिलं गेलंय, बोललं गेलंय मग मी नवीन काय लिहिणार!” असा विचार मनात आला आणि तरिही त्यांच्या बद्दल लिहावसं वाटलं कारण मी त्यांना भेटले होते. हो मी बाईंना भेटले होते!  मी IWEP म्हणजेच इन्टरनॅशनल वर्क अॅन्ड इक्सपीरिअन्स प्रोग्रॅम या श्रेणीच्या ब्रिटिश व्हिसा संदर्भ...

Norway photos

  https://photos.app.goo.gl/iEMd9UPWr3Wkxs9n9

मुलाखत अरविंद प्रभू

 मुलाखत अरविंद प्रभू https://youtu.be/4ZSWla5k184?si=0Jjvjs1JacHnkfSU
 अंबरीश मिश्र  १. अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’ रविवार दि. १ फेब्रुवारी २०२५, रोजी, अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’ हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचा परिचय करून देणारं, ‘जुनी हिंदी चित्रपट गीते आपल्याला अजुनही भुरळ का घालतात?या चिरंतन प्रश्नाचा, गीतांच्या वैशिष्ट्यांसह घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा’ हे वाक्य यथार्थ करणारा हा कार्यक्रम कमालीचा रंगला.  “अल्ला तेरो नाम” या प्रार्थनेच्या ऑडियोने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे वक्ते अंबरीश मिश्र यांचं संस्थेच्यावतीने स्वागत तसेच सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटील यांनी “अक्षरांचे देणे” या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम त्यानी २००७-२०११ या कालखंडात एकूण १७ उत्तमोत्तम कार्यक्रम करून यशस्वीपणे चालवला. काही कारणांनी त्यात खंड पडला. हा उपक्रम पुन्हा सुरू करावा आणि तो सुरू करताना अंबरीश मिश्र यांच्याच, प्रदीप पाटील यांना भावलेल्या कार्यक्रमाने तो सुरू करावा असं त्यांनी ठरवलं. प्रदीप पाटील हे साहित्यिक उ...

चित्रपती व्ही. शांताराम

  चित्रपती व्ही. शांताराम. लोकमान्य सेवा संघ, पारले, या संस्थेच्या, सी. म. जोशी दिलासा केन्द्र    आयोजित, ‘चित्रपती व्ही. शांताराम.’ हा कार्यक्रम गुरुवार, २२ जानेवारी २०२६, रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची संकल्पना, संकलन, संहिता होती वासंती गोखले यांची.    विशेष मार्गदर्शन होते डॉ. रश्मी फडणवीस यांचं. स्व. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाला त्यांचे सुपुत्र सन्माननीय माजी शेरीफ किरणजी शांताराम, यांची उपस्थिती ही या कार्यक्रमाची विशेष उल्लेखनीय गोष्ट ठरली.   या दृकश्राव्य कार्यक्रमात मीरा पेंडसे यांनी    संगणक सहायक ही जबाबदीरी उत्तम पध्दतीने सांभाळली. डॉ. रश्मी फडणवीस, वासंती गोखले, आशा कुलकर्णी, प्रदीप प्रधान, मीरा पेंडसे ह्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने अभिवाचन केलं.  स्मीता बोरकर, सीमा केळकर, वैजयंती थत्ते, विपुल रेवणकर आणि प्रज्ञा भटकळ यांनी सादर केलेल्या “लखलख चंदेरी” गाण्यावरील नृत्याच्या, नृत्य दिग्दर्शक होत्या मानसी आपटे. व्ही शांताराम यांच्या सिनेमातील विविध गाणी त्या गाण्यांच्या मूळ चाली आणि ब...

इंदिरा संतांवरील लेख प्रतिक्रिया

 ‘जळत्या चांदण्यांचा चिद्गंध- इंदिरा संत’ विपुलश्री दिवाळी अंकातील आशुतोष उकिडवे यांचा हा अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि संवेदनशील लेख वाचून जे समजलं, वाटलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏 ‘राधा आणि गोकुळ जागं होण्याआधी वाजलेली मुरली ही फक्त माझ्यासाठी….’ ह्या अत्यानंदाने तनामनाला पाण्यात टाकून भान हरपलेली कुब्जा शब्दात साकारणारी इंदिरा संतांची कविता लेखाच्या सुरवातीला वाचली आणि लेख वाचण्यासाठी उत्सुक झाले.  ह्या लेखात साहित्यिक म्हणून इंदिरा संतांनी राष्ट्रवाद, वर्णव्यवस्था, स्त्रीमुक्ती, शृंगार आणि असे बरेच विषय सोडून एखादा अपवाद वगळता केलेलं व्यक्तिनिष्ठ किंबहुना आत्मनिष्ठ लिखाण, त्यांच्या कवितेतलं निसर्गाचं नेपथ्य किंवा सृष्टीच्या सृजनत्वाचा आणि संहाराचा सहज स्वीकार. साधेपणाने केलेली सुरुवात पण कविता जशी पुढे जाते तशी खोल मनातली खदखद, वेदना, संवेदना अचानक जाणवू लागते. हे असे उल्लेख करत, त्यांच्या वेगवेगळेपणाची तुम्ही जाणीव करून दिलीत. इतकी आत्मकेंद्रित असुनही संपूर्ण साहित्य जगतात आपली नोंद घ्यायला लावणारी किंबहुना नादी लावणारी कविता” हे...