निवारा तिथलं घड्याळ चालतं , तिथे सूर्यही उगवतो , पण तिथल्या काळाला , वेळेचं भान नाही …… दिवस येतो , संपून जातो , महिने आणि ऋतू ही बदलतात , तरिही तिथली , पिकली पानं , असहाय्यपणे जीवनावर लोंबकळतात . निवारा , आधार , सांज , अशा सुखद नावांचे वृध्दाश्रम दिसतात . सुखासुखी कुणी आलेला नसतो , ते माणसांचे कोंडवाडेच असतात . तिथले डोळे रडत असतात , कधी कुणाची तक्रार घेऊन . गुपचुप काही अश्रू झरतात , चुका स्वत : च्या उशिरा कळून . मृत्यू तिथून , रिकाम्या वेळात , फेरफटका , मारून जातो . आधीच मेलेल्या अेका जिवाला , सोबत थोडी करून देतो . ती जागा , रिकामी होताच , नव्यांची पुन्हा झुंबड होते . राजा - राणीच्या , संसारातील , अेक अडचण दूर होते . चारुलता काळे . —————————————— ( ☝️ माझ्या ‘मनस्वी’ ह्या काव्य संग्रहाताला अेक कविता . साधारण पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेली, आता भारतात वृध्दाश्रमांकडे पहाण्याचा दृष्टिकोण , मानसीकता बदलली आहे . बदलते आहे पण तरिही या